Showing posts with label सतीश राजवाडे. Show all posts
Showing posts with label सतीश राजवाडे. Show all posts

Sunday, November 22, 2015

गोष्ट त्याची आणि तिची ....

मी आधीच स्पष्ट करते - हे परीक्षण नाहीये...फक्त काही विचार आहेत...चित्रपट पाहताना आलेले !

आज सतीश राजवाडेचा मुंबई-पुणे -मुंबई २ पाहण्याचा योग आला . ( हो , मी त्याला  ‘ राजवाडेचाअसाच म्हणणार , कारण मी राजवाडेची खूप मोठी  fan  (का काय म्हणतात ना  ती - )आहे  . असंभव मध्ये विक्रांत म्हणून तो फार आवडून गेलेला ….पानाच्या पान खरडलेली त्याच्यावर...जाऊ दे..ते पुन्हा कधीतरी ! )

तर MPM १ आवडला  होता...म्हणून हा बघायचा होता एवढा नक्की . MPM १ मुख्यतः दोन पात्रांची कथा - ज्यांची नावही आपल्याला समजत नाहीत - दोन्ही कलाकारांनी ती छान पेलली होती . अतिशय छान , चुरचुरीत म्हणता येतील असे संवाद - कथा नव्हती तरी त्या चित्रपटाला उद्देश निश्चितच होता .

आजचा भाग मात्र मला काहीसा निरुद्देश वाटला . पहिल्या भेटीत तिने लग्नाला होकार दिला हे ठीक - ( आता त्या दोघांचा गौतम वं गौरी म्हणून बारसं झालय बर का ! ) खरं तर तिने स्पष्ट होकार दिला नव्हता असा मला अंधुकस आठवतंय -(  तरी बर - दोघांनी एक पूर्ण दिवस एकामेकांच्या  संगतीत घालवला होता - नुसता CCD मध्ये दोन तास भेटले नव्हते - आमच्या वेळी अस नव्हत हो ! ) तरीही तिला ही घाई आहे अस वाटत राहत -( बर - वाटेना का ?) कर्मधर्मसंयोगाने त्याला दोन तीन वेळा भेटींची वेळ सांभाळता येत नाही , त्यावरून ही बया लग्न मोडायच ठरवते -मग उर्वरित चित्रपट - पुनश्च प्रियाराधन !  अगदी लग्नाचा दिवस येऊन ठेपतो तरीही हिचा निर्णय काही होत नाही - वाटत - हिला सांगाव - " बाई,  एक काय ते बोल - इस पार या उस पार ! "

आणि अधून मधून आपल्याला Tissot च घड्याळ , रेड label चहा आणि प्रभातच तूप  आणि इतर dairy उत्पादनं याबद्दल माहिती मिळत राहते – प्रेक्षक पाहतात म्हणून काहीही माथी मारा !

एवढा मात्र नक्की – कंटाळा येत नाही – चित्रपट भराभर पुढे सरकत राहतो . खरं तर हा गौतमचाच  चित्रपट , गौरीने फक्त गोंधळाचे अनेक रंग दाखवलेत – अंगद म्हसकर ( अर्णव ) खरं सांगायच तर फार प्रौढ वाटतो- खरं तर कोणीही अगदी तारुण्याच्या पहिल्या भरात नाहीये – तशी अपेक्षाही नसावी या पात्रांकडून .

स्वप्नीलने ( त्याचे काही irritating हसण्याचे shots वगळता ) चांगला अभिनय केलाय . कुटुंबातल्या इतर सदस्यांनी त्यांचे इवलुइवलुसे roles चांगले निभावलेत . पहिल्या भागातले बरेचसे धागेदोरे जुळवण्यात दिग्दर्शक यशस्वी झालाय – जे नाही जुळले ते थापा होत्या म्हणून सोडून दिलय .पण तेही पचत आपल्याला !

माझ्यापुरत सांगायचा झाला तर मला हा चित्रपट आवडला – मी त्याला माझ्या ब श्रेणीत टाकलाय ( म्हणजे बघताना छान वाटले पण परत पहावासा वाटत नाही , पहिला भाग मात्र अ श्रेणीत !  ) आणि एक दुसरा खास निकष – चित्रपट पाहताना रडू आलं तर तो मनाला भिडला ! ( साधारणपणे अर्धा लिटर अश्रू ढाळले मी ! )


शेवटी तो सतीश राजवाडेचा चित्रपट आहे ( आणि तोही पार्लेकर ! ) त्यामुळे त्याला पास होण्यासाठी कमी मार्कांची गरज असणार !