Sunday, November 22, 2015

गोष्ट त्याची आणि तिची ....

मी आधीच स्पष्ट करते - हे परीक्षण नाहीये...फक्त काही विचार आहेत...चित्रपट पाहताना आलेले !

आज सतीश राजवाडेचा मुंबई-पुणे -मुंबई २ पाहण्याचा योग आला . ( हो , मी त्याला  ‘ राजवाडेचाअसाच म्हणणार , कारण मी राजवाडेची खूप मोठी  fan  (का काय म्हणतात ना  ती - )आहे  . असंभव मध्ये विक्रांत म्हणून तो फार आवडून गेलेला ….पानाच्या पान खरडलेली त्याच्यावर...जाऊ दे..ते पुन्हा कधीतरी ! )

तर MPM १ आवडला  होता...म्हणून हा बघायचा होता एवढा नक्की . MPM १ मुख्यतः दोन पात्रांची कथा - ज्यांची नावही आपल्याला समजत नाहीत - दोन्ही कलाकारांनी ती छान पेलली होती . अतिशय छान , चुरचुरीत म्हणता येतील असे संवाद - कथा नव्हती तरी त्या चित्रपटाला उद्देश निश्चितच होता .

आजचा भाग मात्र मला काहीसा निरुद्देश वाटला . पहिल्या भेटीत तिने लग्नाला होकार दिला हे ठीक - ( आता त्या दोघांचा गौतम वं गौरी म्हणून बारसं झालय बर का ! ) खरं तर तिने स्पष्ट होकार दिला नव्हता असा मला अंधुकस आठवतंय -(  तरी बर - दोघांनी एक पूर्ण दिवस एकामेकांच्या  संगतीत घालवला होता - नुसता CCD मध्ये दोन तास भेटले नव्हते - आमच्या वेळी अस नव्हत हो ! ) तरीही तिला ही घाई आहे अस वाटत राहत -( बर - वाटेना का ?) कर्मधर्मसंयोगाने त्याला दोन तीन वेळा भेटींची वेळ सांभाळता येत नाही , त्यावरून ही बया लग्न मोडायच ठरवते -मग उर्वरित चित्रपट - पुनश्च प्रियाराधन !  अगदी लग्नाचा दिवस येऊन ठेपतो तरीही हिचा निर्णय काही होत नाही - वाटत - हिला सांगाव - " बाई,  एक काय ते बोल - इस पार या उस पार ! "

आणि अधून मधून आपल्याला Tissot च घड्याळ , रेड label चहा आणि प्रभातच तूप  आणि इतर dairy उत्पादनं याबद्दल माहिती मिळत राहते – प्रेक्षक पाहतात म्हणून काहीही माथी मारा !

एवढा मात्र नक्की – कंटाळा येत नाही – चित्रपट भराभर पुढे सरकत राहतो . खरं तर हा गौतमचाच  चित्रपट , गौरीने फक्त गोंधळाचे अनेक रंग दाखवलेत – अंगद म्हसकर ( अर्णव ) खरं सांगायच तर फार प्रौढ वाटतो- खरं तर कोणीही अगदी तारुण्याच्या पहिल्या भरात नाहीये – तशी अपेक्षाही नसावी या पात्रांकडून .

स्वप्नीलने ( त्याचे काही irritating हसण्याचे shots वगळता ) चांगला अभिनय केलाय . कुटुंबातल्या इतर सदस्यांनी त्यांचे इवलुइवलुसे roles चांगले निभावलेत . पहिल्या भागातले बरेचसे धागेदोरे जुळवण्यात दिग्दर्शक यशस्वी झालाय – जे नाही जुळले ते थापा होत्या म्हणून सोडून दिलय .पण तेही पचत आपल्याला !

माझ्यापुरत सांगायचा झाला तर मला हा चित्रपट आवडला – मी त्याला माझ्या ब श्रेणीत टाकलाय ( म्हणजे बघताना छान वाटले पण परत पहावासा वाटत नाही , पहिला भाग मात्र अ श्रेणीत !  ) आणि एक दुसरा खास निकष – चित्रपट पाहताना रडू आलं तर तो मनाला भिडला ! ( साधारणपणे अर्धा लिटर अश्रू ढाळले मी ! )


शेवटी तो सतीश राजवाडेचा चित्रपट आहे ( आणि तोही पार्लेकर ! ) त्यामुळे त्याला पास होण्यासाठी कमी मार्कांची गरज असणार ! 

2 comments: