Sunday, February 7, 2016

रवींद्र जैन- एक उपेक्षित संगीतकार

जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात एक सांगीतिक कार्यक्रम पाहण्याचा योग आला. हा कार्यक्रम संगीतकार रवींद्र जैन ह्यांच्या गाण्यावर आधारित होता. खरं तर मी ऑर्केस्ट्रा  वगैरे फारशा आवडीने ऐकत नाही...बऱ्याच वेळा गायक बेसूर गातात आणि कर्णकर्कश अशा संगीताने हे दोष झाकून टाकायचा प्रयत्न केला जातो.( आणि मला सतत " मी ह्यापेक्षा नक्कीच चांगली गाते" असे अतिशायोक्तीपूर्ण भास होत राहतात ते वेगळेच !)पण हा कार्यक्रम निश्चितच आश्चर्याचा एक सुखद धक्का होता.

माझ्या दुर्दैवाने हा कार्यक्रम मला पूर्ण पाहता आला नाही.( आई enjoy करतेय ते मुलांना पाहवत नाही असं म्हणतात ते अगदी खरंच !)पहिल्या रांगेतून,चालू कार्यक्रमातून, उठून जाण्याचा प्रमाद मी केला.असो.पण त्या निमित्ताने ,रवींद्र जैन यांच्या संगीताची, खूप दिवसांनी गाठभेट झाली...हा आनंद इतर सर्व किल्मिषे दूर करून गेला !

ह्या कार्यक्रमातील सर्वच गोष्टी उत्तम! अंबरीश मिश्र यांचं निवेदन - केवळ " मध " म्हणाव असं ! शुध्द हिंदी , कानाला  आणि मनाला अतिशय सुखावणारं असा सुरेख ,अभ्यासपूर्ण निवेदन .रवींद्र जैन आणि एकंदरीत हिंदी सिनेसंगीताबद्दल त्यांना असणारं ज्ञान आणि आस्था सतत जाणवत होती.आयुष्यात प्रथमच ,कुणा निवेदकामुळे  "त्यांचे सर्व कार्यक्रम पाहायला सुरुवात केली पाहिजे   "असं वाटून गेलं मला !

गाण्यांची निवड - सुंदर ! रवींद्र जैन अगदी साध्या , सोप्या ,सरळ , रसाळ अशा  रचना करत ( आणि लिहितही !). ह्यातून जी गाणी निवडली ,ती कानाला सुखावून गेली...अनेक हरवलेली गाणी मला या कार्यक्रमात सापडली ! " सोना , करे झिलमील झिलमील " किंवा " कौन दिसा  में " सारखी गाणी शाळेच्या दिवसात नेहमी विविधभारतीवर लागायची ,पण आता फारशी ऐकू येत नाहीत.' कोतवाल साहब' या चित्रपटातील " साथी रे, भूल ना जाना मेरा प्यार " हे अत्यंत सुरेल आणि तितकंच कठीण गाणं , काहीस अप्रसिद्धच आहे...पण आशाने तिच्या आवडत्या गाण्यात या गाण्याला स्थान दिलं आहे.
तसच " एक राधा एक मीरा " ," हुस्न पहाडोंका " किंवा " तू जो मेरे सूर में " एकाहून एक सरस आणि मधुर !

या कार्यक्रमाच्या यशाचे शिल्पकार - यातील गायक...चौघेही अगदी तयारीचे ,( विद्या , आनंद, प्राजक्ता आणि आलोक ) - उत्कृष्ट पेशकरण ( मी ह्यांच्या पेक्षा चांगली गाते अस मला वाटल नाही...यातच सगळ आल !  )विशेष उल्लेख विद्या या गुणी गायीकेचा...तिने " एक राधा एक मीरा " हे गीत जे गायलंय...अहाहा !! ..त्याला तोडच नाही !

रवींद्र जैन माझे आवडते संगीतकार कधीच नव्हते...जयदेव ,सलील चौधरी ,मदन मोहन ह्यांनी माझा विश्व व्यापल होतं...आता वाटतं ...अन्याय झाला माझ्या हातून... ( त्यांच्या अनेक गाण्यातून दिसणाऱ्या हेमलता ,या गायिकेचा आवाज ,मला फारसा भावला नाही , मी लता आणि आशाच्या पलीकडे फारसं जाऊ शकले नाही ही या गोष्टीची काही कारणे असू शकतील ...  )

" शाम तेरी बन्सी" हे 'गीत गाता चल ' मधील किंवा " दो पंछी दो तिनके" हे ' तपस्या ' मधील गीत घ्या - अशी सुंदर गाणी देणारा संगीतकार माझ्याकडून दुर्लक्षिला गेला हा मोठाच अपराध झाला !! आता या निमित्ताने हा खजिना पुन्हा हाती लागलाय अस वाटून गेलं .....








2 comments:

  1. Maya kaharach aapan kalarasik baryachda tech te panachya mohala bali padato aani kahi surel rachana aani rachanakar durlakshit rahatat ... khup nemakepanane mandalayes tu te ...

    ReplyDelete
  2. Maya kaharach aapan kalarasik baryachda tech te panachya mohala bali padato aani kahi surel rachana aani rachanakar durlakshit rahatat ... khup nemakepanane mandalayes tu te ...

    ReplyDelete